11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था

 





4. सकारण स्पष्ट करा.


अ. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

उत्तर: मानवाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते. हे हिमोग्लोबिन म्हणजे लोहयुक्त प्रथिन ते लोहित रक्तपेशीमध्ये असते. म्हणून मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.




आ. श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.

उत्तर:


2.    बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी असलेल्या  स्नायूच्या  पडद्याला श्वासपटल म्हणतात.


3.    श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते.


4.    बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वा


5.    सपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्‌वास घडण्यासाठी गरजेची असते.


6.    श्वास आणि उच्छवास या दोन्ही क्रिया घडून येण्यासाठी श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.


इ. रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

उत्तर:


1.    रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही .


2.    एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्त्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरच्या रक्ताची आवश्यकता असते.


3.    निरोगी व्यक्तीच्या शरीरातून घेतलेले रक्त रुग्णास पुरवले जाते यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो . म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले आहे.


 


ई. ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.

उत्तर:


    1.  गटाचे रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर सर्व गटांना देता येते.


म्हणून ‘O’ रक्तगटाला सार्वत्रिक  दाता असे म्हणतात.


 


उ. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.

उत्तर:


1.    मिठात सोडीअम असते. जर आपण मिठाचा आहारात जास्त प्रमाणात वापर केला तर त्यातील सोडीअम मुळे उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो.


2.    रक्तदाब वाढण्याची ही स्थिती धोकादायक ठरू शकते. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.


 


5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

 


अ. रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन  संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर:


1.    श्वसन, पचन व उत्सर्जन  या संस्थांचे कार्य एकमेकांशी संबधित आहे.


2.    पचन संस्थेमध्ये जटील अन्नपदार्थांचे सध्या व विद्राव्य पोषणद्रव्यांत रुपांतर होते.


3.    ही पोषणद्रव्ये रक्तप्रवाहात शोषली जातात आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोहचवली जातात.


4.    श्वसनसंस्थेमार्फत शरीरात शोषलेला ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो.


5.    हिमोग्लोबिन च्या मदतीने रक्तात शोषलेला हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहचवला जातो.


6.    याच वेळी निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू उच्छवासाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो.


आ. मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

उत्तर:


1.    वायूंचे परिवहन :  फुप्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुप्फुसांमध्ये CO 2 आणला जातो.


2.    पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खाद्य पुरविणे) :अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषणत्त्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.


3.    टाकाऊ पदार्थांचे वहन: युरिया, अमोनिया, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात.


4.    शरीररक्षण: रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण


5.    विकर व संप्रेरक परिवहन : विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात करतात.


6.    शरीरातील सोडिअम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे.


 


इ. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

उत्तर:


1.    रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही .


2.    एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्त्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरच्या रक्ताची आवश्यकता असते.


3.    निरोगी व्यक्तीच्या शरीरातून घेतलेले रक्त रुग्णास पुरवले जाते यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो .


4.    कुणाला कधीही रक्ताची आवश्यकता भासू शकते. एका व्यक्तीच्या रक्तदानाने १ ते २  रुग्णांचे प्राण वाचू शकतात. म्हणून रक्तदान करणे खूप महत्वाचे आहे.




8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा. (हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक,अनैच्छिक, आम्लधर्मी)


अ. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ................ हे लोहाचे संयुग असते.


उत्तर: रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते.




आ. ......... हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.


उत्तर: श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते




इ. हृदय स्नायू............. असतात.


उत्तर: हृदय स्नायू अनैच्छिक असतात.


ई. ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ....असते.


उत्तर:ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.




उ. RBC ची निर्मिती ....... मध्ये होते.


उत्तर: RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये होते.


 


 


9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.


अ. A, O, K, AB, B


उत्तर: K .




आ. रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका


उत्तर: रक्तपराधान




इ. श्वासनलिका, वायूकोश, श्वासपटल, केशिका


उत्तर: केशिका




ई. न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, ॲल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन


उत्तर: न्यूट्रोफिल


 


10. खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा. आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी,  हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस  अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा  श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू  लागली आहेत.

उत्तर: 


1.    बाळाच्या हृदयाच्या कार्यात बिघाड झाला असावा.


2.    निळसर पडलेली नखे ही रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी असल्याचे दर्शवतात.


3.    बाळाला श्वसनसंस्थेचे विकार असण्याची शक्यता आहे.


 


2.         तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे  नि  दान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात  राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे?


उत्तर:


1.    डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आहार आणि औषधे घेतली पाहिजेत.


2.    आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.


3.    लोणचे, पापड, तसेच हवाबंद डब्यात असणारे पदार्थांचे सेवन करणे थांबवले पाहिजे. कारण यामध्ये परिरक्षक पदार्थांची मात्रा असते.


4.    काकांनी ताण तणाव कमी करण्यावर भर दिला पाहिजे.

Post a Comment

0 Comments